हरलो आज जरी मी,

हा माझा श्वास नाही.

घेऊन उद्याची मशाली,

हे शौर्य उद्या नाही.


जिर्ण जरी झाले डोळे,

थंड आग नाही.

देऊन धडक कातळाला,

मानव जातीस भ्रांत नाही.


माझ्या आज निशाणीचे,

पेरलेत वैर सारे.

जळतील जेंव्हा प्रगतीचे,

नवे बाहू बीज पेरण्याचे.


पेटण्यास उठावे काही,

थांबण्यास अर्थ नाही.

झटकूनी जरी माना,

लाचार स्वाभिमान न ठेवा.


परतुनी येईल,कलतूनी जाईल,

निर्भर आभाळ शांत.

संयम ठेऊनी व्याकूळ,

स्थिर पाऊले भविष्यात.


...@श्री.सोमनाथ पाटील.


Comments

Popular posts from this blog

गोञ व कुळ यादी

गणितातील एकके

भारतीय समाज सुधारक आणि त्यांच्या सामाजिक संस्था,कार्य,कायदे