सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरची नाविन्यता
*खाद्यसंस्कृती इस्लामपूरची...*
इस्लामपूर आणि ईश्वरपूरही असं नाव असलेलं आमचं हे गाव म्हंटल तर मोठं गाव आणि म्हंटल तर छोटेखानी शहर.शिक्षण संकुलांमुळे आणि शैक्षणिक संस्कृतीमुळे नावाजलेलं आणि सुसंस्कृत असणार आमचं हे गाव.गावाच्या आजूबाजूच्या छोट्या छोट्या खेडेगावातील लोकांना दिवसातून एक दिवस इस्लामपूरला चक्कर टाकून आल्याशिवाय राहवत नाही असं हे ठिकाण.कपडे खरेदी,छोट्या मोठ्या वस्तू,किराणा माल असा सारा बाजारहाट करायचे त्यांचे ठिकाण म्हणजे इस्लामपूरच.सांगायला तालुका वाळवा पण सगळी सूत्र हलणार ती इस्लामपुरातूनच. कराड, सांगली, कोल्हापूर अश्या शहरांचा मध्यवर्ती बिंदू म्हणजे इस्लामपूर ,साहजिकच नोकरदार वर्गाला मुलांच्या शाळेचा आणि राहण्याचा प्रश्न सोडवणार गाव म्हंटल तर इस्लामपूरला पर्याय नाही ,आताशा आमच्याही गावात फ्लॅट संस्कृतीने आपली पाळेमूळे घट्ट रोवली आहेतच,शहरावर लोकसंख्येचा ताण जाणवतोय पण असो,कालाय तस्मय नमः।
आजचा विषय आहे इस्लामपूरच्या खाद्यसंस्कृतीचा.. कोल्हापूर म्हंटल की तांबडा पांढरा रस्सा आणि दरदरून घाम काढणारी मिसळ हे समीकरण आहे.सांगलीची भेळ जशी चांगली तस सांगली म्हंटल की भडंग हे ही एक समीकरण लागू होत.अशी काही जिल्ह्याची गावे म्हणून प्रसिद्ध झालेले पदार्थ. मग इस्लामपूर म्हणजे काय बरं याचे उत्तर कोणत्याही एका खाद्य वस्तूत देताच येत नाही असं मला वाटत. आमच्या इस्लामपूरला लाभलेल्या शैक्षणिक संकुलांमुळे आणि संस्कृतीमुळे खाद्यसंस्कृतीमध्येही एक सुसंस्कृतपणा आला आहे.नाही म्हंटल तरी आख्खा मसूर हा पदार्थ आहे सांगण्याजोगा पण या एकाच पदार्थाला शीत समजून भाताची परीक्षा घेणं योग्य ठरणार नाही.अमंगळ तिखट,ठसकेदार असंही काही इथे मिळणार नाही आणि मिळमिळीत,बेचव असंही काही असणार नाही खाण्यापिण्याचा समतोल,आणि चवीतही मोजून मापून वापरलेले सारे जिन्नस हे ही इथले एक वैशिष्ट्य.विशेषतः इस्लामपुरातील घराघरात मिळणारी चविष्ट मेजवानी ही बाहेर हॉटेल मध्ये मिळणाऱ्या खाण्यापेक्षा महत्वपूर्ण असते.त्याची आरोग्याशी सांगड हा विचार इथे महत्वाचा ठरतो.इथल्या स्त्रिया आपल्या घराला इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त प्राधान्य देणाऱ्या, पाहुण्यांचे अगत्य हे आपलं प्रथम कर्तव्य मानणाऱ्या अश्याच.त्यामुळे ही इस्लामपुरात हे हे छान मिळत चला बाहेर जेवायला हा प्रकार इथे नसतो.पाहुण्यांच्या आवडीनिवडी जाणून त्यांच्यासाठी उस्तरवार करीत राहणे हे इस्लामपुरातील स्त्रियांचा अगत्याशील स्वभाव अधोरेखित करतो.मला वाटत एखाद्या प्रांतात एक विशिष्ट खाद्यसंस्कृती उदयास येणं म्हणजे त्या त्या भागातील लोकांची ती संस्कृती ,सवय, खाण्याची लकब किंवा गरज म्हणूया त्यातून ती उदयास येत असते.
इस्लामपूरची माणसे मूळची इथली बर का किंवा मग गेले वीस पंचवीस वर्षे इथे राहून इथल्या मातीच्या रंगात मिसळलेली माणसं ही जात्याच इस्लामपूच्या पाण्यासारखी गोड स्वभावाची(हे मलाही लागू होतेच आहे बर का,कोई शक?😊)आमचे पाणी कृष्णा नदीतुन मिळणारे.चविष्ट आणि गोड.त्यामुळे इतर ठिकाणी मी असले की इतर ठिकाणचे पाणी एक तर घशातून खाली उतरत नाही अडकूनच बसते असा अनुभव येतो.मग तहान भागणे ही फार लांबची गोष्ट.मग अश्या कृष्णा नदीच्या पाण्यावर पोसलेले आम्हीही गोड आणि रानातील भाजीपालाही चविष्ट..
इस्लामपूरच्या बाजारात आजूबाजूच्या खेडेगावातून आलेला भाजीपाला हाच काय तो अस्सल रानमेवा असा माझं निश्चित आणि ठाम मत आहे.आमच्या इस्लामपुरात रोज सकाळी जुनी भाजी मंडई नावाने भरणारी गणपती मंदिराजवळची मंडई तर भाजी घ्या ताजी ताजी या वाक्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकच.तिथूनच आणलेली लुसलुशीत काकडी याला आमचे पप्पा वाळूक म्हणतात.आमचे पप्पा जेवायला बसले की 5,6,7,8 स्टार हॉटेलच्या सलाड डिश ला मागे सारेल असे सलाड ते रोज आठवणीने आणि न कंटाळता सिझन नुसार खातातच. यात कोवळी काकडी (तीही पांढरी काकडी नव्हे बर का ,एरिवारी मिळणारी ही पांढरी काकडी आमच्या घरी कधीच आणत नाही त्याने सर्दी होते असे आमच्या पप्पांचे म्हणणे असते.)कांद्याची पात,कोवळी वांगी,कोवळा कांदा, लसूण,कोवळी कोथिंबीर,कोवळी मेथीची भाजी,शेंगा असे त्या त्या सिझन मध्ये मिळणारे पदार्थ असतात.
इस्लामपूरच्या घराघरात आजही वर्षभराची चटणी करून ठेवणे वर्षभराची लोणची घालून ठेवणे ही कामे न कंटाळता केली जातात. शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी,तिळाची चटणी या चटण्या आठवड्यातून ,पंढरवड्यातून एकदा केल्या जातातच.घरीच दुधाचे दाटसर ,नैसर्गिक दही लावून ते रवीने घुसळून लोणी काढणे त्याचे साजूक तूप कढवणे,राहिलेले ताक सकाळी जेवणासोबत आणि त्यातील उरलेल्या ताकाची खमंग कढी रात्री असा बेत रात्री असतो.काही जण त्यात तळलेल्या छोट्या छोट्या भजी सोडून कढी पकोडेही तयार करतात.
बाजारात मिळतात,स्वस्तही असतात त्यामुळे सर्व पालेभाज्या करून खाल्ल्या जातात.लोणची त्यातही सिझन नुसार मिळणाऱ्या पदार्थाची लोणची घराघरात केलेली आजही आढळून येतील. यातही आमच्या घरी माईन मुळ्याचे लोणचे सर्वांचे विशेष आवडीचे.दिवाळी म्हंटल की घराघरात जिभेचा गुळमाटपणा घालवायला मिरच्या खमंग भाजून ,खोबरे,लसूण मुबलक वापरून केलेला खर्डा आलाच. जसे ऋतू मागून ऋतू येतात तसे घरात पदार्थ ही क्रमाने येतात .वांगी पोटात बी धरू लागली की ती त्याज्य मग त्याचा अधिकृत सिझन सुरू होईपर्यंत ती आमच्या घरी आजही वर्ज्य मनाली जातात.पदार्थांवरचे संस्कार हे चवीसाठी न होता ते शास्त्रीय पद्धतीने होतात हे प्रामुख्याने पाहिले जाते.
इस्लामपूरात वशाट खाणं किंवा मांसाहार हा उरणात मोठ्या प्रमाणात बनवला जातो.ज्यांचे पाहुणे उरणात राहतात त्यांना मग कोल्हापूरच्या तांबड्या पांढरा रस्सा आठवणारही नाही असाच बेत असतो.घरी पाट्यावर बारीक केलेला खमंग मसाला असतो.जे बनवायचे ते अस्सलच त्यामुळे खवय्यांसाठी विशेषतः चोखंदळ खवय्यांसाठी इस्लामपूर म्हणजे एक खाण्याची मेजवानी देणारे ठिकाण आहे.
पुरणपोळी,बाजरीची भाकरी,संक्रातीची मिक्स भाजी,अळूवडी,भजी, भरलं वांग,वांग्याचे भरीत,पालक भाजी,चाकवत गरगटा ,कारले अशी किती आणि किती नावे घ्यावी तेवढं थोडच आहे.शिवाय या सोबत आमच्या इस्लामपूरातच तयार होणारा लिज्जत पापड असतोच.शिवाय गृहिणीने पूर्ण उन्हाळा राबून बनवलेल्या शेवया असतात,कुरवड्या, भतवड्या,उडीद(उडदावरून आठवलं उडदाच्या गरम गरम आमटीचा भुरका प्रसिद्ध आहे बर का)आणि नाचणीचे पापड.सांडग्याची आमटी हे ही असतेच.
बाजारात पिकलेला हापूस अधिकृत पणे येण्यापूर्वी कच्चे पाडाचे आंबे आणून त्याचा गूळाम्बा केला जातो.दीपालीच्या मम्मीने बनवलेले त्यांच्याच अंगणातील हापूस आंब्याचे पन्हे म्हणजे साक्षात रखरखत्या उन्हात शरीराला आणि मनालाही गारवा देणारे अमृतच जणू.
ही झाली घराघरातील खाद्य संस्कृती बाहेरच पाय मोकळे करता करता काही खायचा असा विचार असलेल्या पाहुण्यांना गांधी चौकातील छोट्याश्या खाऊगल्लीत घेऊन गेल की गृहिणीला मग रात्री जेवण करण्यापासून एक दिवस तरी आराम मिळतो.सोमनाथ ची भेळ ही आपले वैशिष्ट्य गेली कित्येक वर्षे टिकवून आहे.अन्नपूर्णा नावाची भेळही आहे मोमीन मोहल्ल्यात.शिवाय आमच्या इस्लामपूरचे वैशिष्ट्य हे की घरीही आणि बाहेर हॉटेल आणि भेळसारख्या गाड्यांवरही मोजून मापून निगुतीने देण्याची के भानगड नाही जे द्यायचे ते वारेमापच. काही अतिचोखंदळ थोडी शेव द्या म्हणून प्लेट पुढे करतील तर दुकानदार अगत्याने शेवेची भरलेली मूठ पुढे करतील.याचे पैसे वेगळे ,त्याचे वेगळे अस मोजमाप आणि किंमत कुठेच लावली जात नाही.इथेही मूल्य महत्वाचं हा विचार जोपासला जातोच.खाता खाता छान आहे असं कौतुक करायचा अवकाश भेळवाला आणि थोडी भेळ आपल्या प्लेट मध्ये टाकण्याच्या तयारीने पुढे सरसावतोच.
सोमनाथच्या दुकानाला लागून बॉम्बे आईस्क्रीम आहे इथली कुल्फी तर छोट्या मंडळींची जीव की प्राण,मातीच्या छोट्या मटक्यातून मिळणारे आईस्क्रीम ही चविष्ट, महाराष्ट्र बेकरीतील सर्व पदार्थ विशेषतः फरसाना उत्तमच.आता अलीकडे दोन भावांची भांडणे होऊन दोघांनी एकमेकाजवळ बेकरी काढल्या मी बहुदा चेहेर्यावरून साध्या वाटणाऱ्या मोठ्या भावाच्या बेकरीतून खरेदी करते.छोटा भाऊ चांगला नाही असा त्याचा अर्थ नाही.असो.
आमच्या इथे कचेरीजवळ ऊसाचा रसही छान मिळतोच.यल्लमा चौकातील भजी म्हातारं आई होती तेंव्हाच आणायला जायचो आता तिकडे जाण्याचे काही प्रयोजन नाही राहिले.काही चायनीज गाडे आहेत पण शहाणे लोक तिकडे फिरकतही नाहीत.पण कॉलेजची मुले मात्र अश्याच चटपटीत खाण्याकडे ओढली जातात.इस्लामपुरची ही खाद्य संस्कृती बदलणाऱ्या संस्कृतीच्या वाऱ्यापरत्वे बदलत राहील मात्र त्यातील अस्सलपणा आणि साधेपणा आणि सोज्वळपणा लोप पावू नये इतकंच वाटत...
इस्लामपूर आणि ईश्वरपूरही असं नाव असलेलं आमचं हे गाव म्हंटल तर मोठं गाव आणि म्हंटल तर छोटेखानी शहर.शिक्षण संकुलांमुळे आणि शैक्षणिक संस्कृतीमुळे नावाजलेलं आणि सुसंस्कृत असणार आमचं हे गाव.गावाच्या आजूबाजूच्या छोट्या छोट्या खेडेगावातील लोकांना दिवसातून एक दिवस इस्लामपूरला चक्कर टाकून आल्याशिवाय राहवत नाही असं हे ठिकाण.कपडे खरेदी,छोट्या मोठ्या वस्तू,किराणा माल असा सारा बाजारहाट करायचे त्यांचे ठिकाण म्हणजे इस्लामपूरच.सांगायला तालुका वाळवा पण सगळी सूत्र हलणार ती इस्लामपुरातूनच. कराड, सांगली, कोल्हापूर अश्या शहरांचा मध्यवर्ती बिंदू म्हणजे इस्लामपूर ,साहजिकच नोकरदार वर्गाला मुलांच्या शाळेचा आणि राहण्याचा प्रश्न सोडवणार गाव म्हंटल तर इस्लामपूरला पर्याय नाही ,आताशा आमच्याही गावात फ्लॅट संस्कृतीने आपली पाळेमूळे घट्ट रोवली आहेतच,शहरावर लोकसंख्येचा ताण जाणवतोय पण असो,कालाय तस्मय नमः।
आजचा विषय आहे इस्लामपूरच्या खाद्यसंस्कृतीचा.. कोल्हापूर म्हंटल की तांबडा पांढरा रस्सा आणि दरदरून घाम काढणारी मिसळ हे समीकरण आहे.सांगलीची भेळ जशी चांगली तस सांगली म्हंटल की भडंग हे ही एक समीकरण लागू होत.अशी काही जिल्ह्याची गावे म्हणून प्रसिद्ध झालेले पदार्थ. मग इस्लामपूर म्हणजे काय बरं याचे उत्तर कोणत्याही एका खाद्य वस्तूत देताच येत नाही असं मला वाटत. आमच्या इस्लामपूरला लाभलेल्या शैक्षणिक संकुलांमुळे आणि संस्कृतीमुळे खाद्यसंस्कृतीमध्येही एक सुसंस्कृतपणा आला आहे.नाही म्हंटल तरी आख्खा मसूर हा पदार्थ आहे सांगण्याजोगा पण या एकाच पदार्थाला शीत समजून भाताची परीक्षा घेणं योग्य ठरणार नाही.अमंगळ तिखट,ठसकेदार असंही काही इथे मिळणार नाही आणि मिळमिळीत,बेचव असंही काही असणार नाही खाण्यापिण्याचा समतोल,आणि चवीतही मोजून मापून वापरलेले सारे जिन्नस हे ही इथले एक वैशिष्ट्य.विशेषतः इस्लामपुरातील घराघरात मिळणारी चविष्ट मेजवानी ही बाहेर हॉटेल मध्ये मिळणाऱ्या खाण्यापेक्षा महत्वपूर्ण असते.त्याची आरोग्याशी सांगड हा विचार इथे महत्वाचा ठरतो.इथल्या स्त्रिया आपल्या घराला इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त प्राधान्य देणाऱ्या, पाहुण्यांचे अगत्य हे आपलं प्रथम कर्तव्य मानणाऱ्या अश्याच.त्यामुळे ही इस्लामपुरात हे हे छान मिळत चला बाहेर जेवायला हा प्रकार इथे नसतो.पाहुण्यांच्या आवडीनिवडी जाणून त्यांच्यासाठी उस्तरवार करीत राहणे हे इस्लामपुरातील स्त्रियांचा अगत्याशील स्वभाव अधोरेखित करतो.मला वाटत एखाद्या प्रांतात एक विशिष्ट खाद्यसंस्कृती उदयास येणं म्हणजे त्या त्या भागातील लोकांची ती संस्कृती ,सवय, खाण्याची लकब किंवा गरज म्हणूया त्यातून ती उदयास येत असते.
इस्लामपूरची माणसे मूळची इथली बर का किंवा मग गेले वीस पंचवीस वर्षे इथे राहून इथल्या मातीच्या रंगात मिसळलेली माणसं ही जात्याच इस्लामपूच्या पाण्यासारखी गोड स्वभावाची(हे मलाही लागू होतेच आहे बर का,कोई शक?😊)आमचे पाणी कृष्णा नदीतुन मिळणारे.चविष्ट आणि गोड.त्यामुळे इतर ठिकाणी मी असले की इतर ठिकाणचे पाणी एक तर घशातून खाली उतरत नाही अडकूनच बसते असा अनुभव येतो.मग तहान भागणे ही फार लांबची गोष्ट.मग अश्या कृष्णा नदीच्या पाण्यावर पोसलेले आम्हीही गोड आणि रानातील भाजीपालाही चविष्ट..
इस्लामपूरच्या बाजारात आजूबाजूच्या खेडेगावातून आलेला भाजीपाला हाच काय तो अस्सल रानमेवा असा माझं निश्चित आणि ठाम मत आहे.आमच्या इस्लामपुरात रोज सकाळी जुनी भाजी मंडई नावाने भरणारी गणपती मंदिराजवळची मंडई तर भाजी घ्या ताजी ताजी या वाक्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकच.तिथूनच आणलेली लुसलुशीत काकडी याला आमचे पप्पा वाळूक म्हणतात.आमचे पप्पा जेवायला बसले की 5,6,7,8 स्टार हॉटेलच्या सलाड डिश ला मागे सारेल असे सलाड ते रोज आठवणीने आणि न कंटाळता सिझन नुसार खातातच. यात कोवळी काकडी (तीही पांढरी काकडी नव्हे बर का ,एरिवारी मिळणारी ही पांढरी काकडी आमच्या घरी कधीच आणत नाही त्याने सर्दी होते असे आमच्या पप्पांचे म्हणणे असते.)कांद्याची पात,कोवळी वांगी,कोवळा कांदा, लसूण,कोवळी कोथिंबीर,कोवळी मेथीची भाजी,शेंगा असे त्या त्या सिझन मध्ये मिळणारे पदार्थ असतात.
इस्लामपूरच्या घराघरात आजही वर्षभराची चटणी करून ठेवणे वर्षभराची लोणची घालून ठेवणे ही कामे न कंटाळता केली जातात. शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी,तिळाची चटणी या चटण्या आठवड्यातून ,पंढरवड्यातून एकदा केल्या जातातच.घरीच दुधाचे दाटसर ,नैसर्गिक दही लावून ते रवीने घुसळून लोणी काढणे त्याचे साजूक तूप कढवणे,राहिलेले ताक सकाळी जेवणासोबत आणि त्यातील उरलेल्या ताकाची खमंग कढी रात्री असा बेत रात्री असतो.काही जण त्यात तळलेल्या छोट्या छोट्या भजी सोडून कढी पकोडेही तयार करतात.
बाजारात मिळतात,स्वस्तही असतात त्यामुळे सर्व पालेभाज्या करून खाल्ल्या जातात.लोणची त्यातही सिझन नुसार मिळणाऱ्या पदार्थाची लोणची घराघरात केलेली आजही आढळून येतील. यातही आमच्या घरी माईन मुळ्याचे लोणचे सर्वांचे विशेष आवडीचे.दिवाळी म्हंटल की घराघरात जिभेचा गुळमाटपणा घालवायला मिरच्या खमंग भाजून ,खोबरे,लसूण मुबलक वापरून केलेला खर्डा आलाच. जसे ऋतू मागून ऋतू येतात तसे घरात पदार्थ ही क्रमाने येतात .वांगी पोटात बी धरू लागली की ती त्याज्य मग त्याचा अधिकृत सिझन सुरू होईपर्यंत ती आमच्या घरी आजही वर्ज्य मनाली जातात.पदार्थांवरचे संस्कार हे चवीसाठी न होता ते शास्त्रीय पद्धतीने होतात हे प्रामुख्याने पाहिले जाते.
इस्लामपूरात वशाट खाणं किंवा मांसाहार हा उरणात मोठ्या प्रमाणात बनवला जातो.ज्यांचे पाहुणे उरणात राहतात त्यांना मग कोल्हापूरच्या तांबड्या पांढरा रस्सा आठवणारही नाही असाच बेत असतो.घरी पाट्यावर बारीक केलेला खमंग मसाला असतो.जे बनवायचे ते अस्सलच त्यामुळे खवय्यांसाठी विशेषतः चोखंदळ खवय्यांसाठी इस्लामपूर म्हणजे एक खाण्याची मेजवानी देणारे ठिकाण आहे.
पुरणपोळी,बाजरीची भाकरी,संक्रातीची मिक्स भाजी,अळूवडी,भजी, भरलं वांग,वांग्याचे भरीत,पालक भाजी,चाकवत गरगटा ,कारले अशी किती आणि किती नावे घ्यावी तेवढं थोडच आहे.शिवाय या सोबत आमच्या इस्लामपूरातच तयार होणारा लिज्जत पापड असतोच.शिवाय गृहिणीने पूर्ण उन्हाळा राबून बनवलेल्या शेवया असतात,कुरवड्या, भतवड्या,उडीद(उडदावरून आठवलं उडदाच्या गरम गरम आमटीचा भुरका प्रसिद्ध आहे बर का)आणि नाचणीचे पापड.सांडग्याची आमटी हे ही असतेच.
बाजारात पिकलेला हापूस अधिकृत पणे येण्यापूर्वी कच्चे पाडाचे आंबे आणून त्याचा गूळाम्बा केला जातो.दीपालीच्या मम्मीने बनवलेले त्यांच्याच अंगणातील हापूस आंब्याचे पन्हे म्हणजे साक्षात रखरखत्या उन्हात शरीराला आणि मनालाही गारवा देणारे अमृतच जणू.
ही झाली घराघरातील खाद्य संस्कृती बाहेरच पाय मोकळे करता करता काही खायचा असा विचार असलेल्या पाहुण्यांना गांधी चौकातील छोट्याश्या खाऊगल्लीत घेऊन गेल की गृहिणीला मग रात्री जेवण करण्यापासून एक दिवस तरी आराम मिळतो.सोमनाथ ची भेळ ही आपले वैशिष्ट्य गेली कित्येक वर्षे टिकवून आहे.अन्नपूर्णा नावाची भेळही आहे मोमीन मोहल्ल्यात.शिवाय आमच्या इस्लामपूरचे वैशिष्ट्य हे की घरीही आणि बाहेर हॉटेल आणि भेळसारख्या गाड्यांवरही मोजून मापून निगुतीने देण्याची के भानगड नाही जे द्यायचे ते वारेमापच. काही अतिचोखंदळ थोडी शेव द्या म्हणून प्लेट पुढे करतील तर दुकानदार अगत्याने शेवेची भरलेली मूठ पुढे करतील.याचे पैसे वेगळे ,त्याचे वेगळे अस मोजमाप आणि किंमत कुठेच लावली जात नाही.इथेही मूल्य महत्वाचं हा विचार जोपासला जातोच.खाता खाता छान आहे असं कौतुक करायचा अवकाश भेळवाला आणि थोडी भेळ आपल्या प्लेट मध्ये टाकण्याच्या तयारीने पुढे सरसावतोच.
सोमनाथच्या दुकानाला लागून बॉम्बे आईस्क्रीम आहे इथली कुल्फी तर छोट्या मंडळींची जीव की प्राण,मातीच्या छोट्या मटक्यातून मिळणारे आईस्क्रीम ही चविष्ट, महाराष्ट्र बेकरीतील सर्व पदार्थ विशेषतः फरसाना उत्तमच.आता अलीकडे दोन भावांची भांडणे होऊन दोघांनी एकमेकाजवळ बेकरी काढल्या मी बहुदा चेहेर्यावरून साध्या वाटणाऱ्या मोठ्या भावाच्या बेकरीतून खरेदी करते.छोटा भाऊ चांगला नाही असा त्याचा अर्थ नाही.असो.
आमच्या इथे कचेरीजवळ ऊसाचा रसही छान मिळतोच.यल्लमा चौकातील भजी म्हातारं आई होती तेंव्हाच आणायला जायचो आता तिकडे जाण्याचे काही प्रयोजन नाही राहिले.काही चायनीज गाडे आहेत पण शहाणे लोक तिकडे फिरकतही नाहीत.पण कॉलेजची मुले मात्र अश्याच चटपटीत खाण्याकडे ओढली जातात.इस्लामपुरची ही खाद्य संस्कृती बदलणाऱ्या संस्कृतीच्या वाऱ्यापरत्वे बदलत राहील मात्र त्यातील अस्सलपणा आणि साधेपणा आणि सोज्वळपणा लोप पावू नये इतकंच वाटत...
Comments
Post a Comment